कृषिमंत्री कोकाटे तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्म घ्या -अभिजीत पवार
- कृषिमंत्री कोकाटे तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्म घ्या -अभिजीत पवार
- बीड प्रतिनिधी – राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. पिक कर्ज घेऊन शेतकरी आपल्या मुलीचे लग्न करतात साखरपुडा करतात मग त्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी चुकी केली की काय ? कृषिमंत्री कोकाटे तुम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आहे का ? तुम्हाला अन्नधान्य खायला लागत नसेल म्हणून तुम्ही शेतकऱ्यावर अशा प्रकारचे वक्तव्य करताय, शेतकऱ्यांमुळे आज तुम्ही जिवंत आहात हे तरी लक्षात ठेवा, शेतीमालाला भाव नसल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत सापडत आहे. विधानसभा निवडणूक लागण्या अगोदर सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून महायुती सरकारला आपले बहुमूल्य मत देऊन सरकार सत्तेमध्ये आणले. परंतु एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मी कुठेही शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू असे म्हटले नाही तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री कोकाटे शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करतात. 2013 साली सोयाबीन पिकाला भाव 4500 रुपये होता साधारणता 17 वर्षानंतर सुद्धा सोयाबीनचा भाव तोच आहे, सगळ्या वस्तुच्या किंमती वाढतात मग शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव का नाही. कृषी मंत्री साहेब तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला यायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांविषयी दया आली असती. तुमच्याकडे सरकारची तिजोरी आहे त्यासाठी हजारो गोरगरिबांचे लग्न होतील अशा तुमच्या एका मुलाचे लग्न होतात. मग तुम्हाला आमच्या 1 लाख, 50 हजार अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याकडे कर्ज आहे ते तुम्हाला माफ करता येईना मग तुम्ही निवडणुकी अगोदर आश्वासने का दिली ? अगोदर आश्वासन द्यायची नंतर शेतकऱ्यावर टीका करायची हाच तुमचा धंदा की काय ? गेली सात वर्ष झालं शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्ज आहे तरी शेतकरी नवीन जुने तरी करतोय,तुमच्याकडे अनेक वर्षांपासून शासनाचा निधी मधून तुम्ही जगताय म्हणून तुम्हाला शेतकरी कुटुंबाची जाणीव नाही. कृपा करून शेतकऱ्यांवर अशा प्रकारच्या टीका करू नका. तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. आम्ही शेतकरी मुलींचे लग्न करू साखरपुडा करू मात्र तुम्ही सरकारच्या निधीमध्ये खुश रहा. तुम्हाला कर्जमाफी करायची नसेल तर शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे बेताल वक्तव्य तरी करू नका अशी विनंती शेतकरी पुत्र अभिजीत पवार यांनी केली आहे..
error: Content is protected !!